धाराशिव – समय सारथी
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर सुरु केलेल्या कारवाईचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी कौतुक करीत त्यांना पाठिंबा दिला. सरकारने त्यांच्या बदलीची भानगड केली तर पाठीशी लागेल असा इशारा दिला. जरांगे हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे आले असता त्यांनी इशारा दिला.
तुकाराम मुंडे यांनी जी धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे, ती चांगली असुन त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव येणार आहे. भेसळ बंद झाली की दुधाला चांगला भाव व मागणी येऊ शकते. मुंडे यांच्या बदलीच्या लफड्यात सरकारने आता पडू नये, त्यांना तिथेच राहू द्या, त्यांना काम करू द्या. सरकारने जर त्यांची बदली केली किंवा तशी भानगड केली तर मी सरकारच्या मागे लागेल असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला व मुंडे यांना पाठबळ दिले.
सरकार लवकरच सातारा, कोल्हापूर व मराठवाडा गॅझेट स्वीकारेल त्यामुळे पुन्हा आंदोलन करण्याची वेळ सरकार येऊ देईल असे वाटत नाही. 22 जुन पर्यंत या 3 गॅझेटवर काय करते हे स्पष्ट होईल. सरकार सकारात्मक दिसते, त्यांनी नाही केल्यास आंदोलन करू असे ते म्हणाले. शेतकऱ्याची कर्जमाफी नाही तर कायमची कर्जमुक्ती हवी आहे असे ते म्हणाले. शेती मालाला भाव द्या त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्ज काढणार नाही, आत्महत्या करणार नाही. आरक्षणाचा मुद्दा संपला की शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार असल्याचे ते म्हणाले.











