धाराशिव – समय सारथी
आर्थिक अडचणीमुळे धाराशिव जिल्ह्यात एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नी व लहान मुलाला विष पाजून नंतर एका तरुणाने आत्महत्या केली. धाराशिव तालुक्यातील बावी येथे ही दुर्दैवी घटना आहे. लक्ष्मण मारुती जाधव या 30 वर्षीय तरुणाने पत्नी तेजस्वीनी व 2 वर्षाचा लहान मुलगा शिवांश याला विष दिले व त्यानंतर स्वतः विष पिऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.

लक्ष्मण हा आर्थिक अडचणीत होता त्याला ऑनलाईन रमी व शेअर बाजारात मोठे आर्थिक नुकसान झाले त्यातून त्याने जमीन विकल्याची प्राथमिक माहिती आहे, आर्थिक संकट सहान ण झाल्याने त्याने अख्खे कुटुंब संपविले. पोलीस अधीक्षक रितु खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरु आहे.