धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात पोलिस, महसूल व नगर परिषदेच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत 4 कत्तलखाने उध्वस्त केले आहेत, धाराशिव शहरासह जिल्ह्यात खुलेआम गोवंश हत्या सुरु असुन कत्तलखाने सुरु आहेत. अनेक ठिकाणी अवैध, अनधिकृत व शासकीय जागेवर अतिक्रमण करुन कत्तलखाने सुरु आहेत. कारवाई झाली की पुन्हा त्याचं ठिकाणी कत्तलखाने सुरु होत असल्याने याला पाठबळ कोणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यापक मोहीम हातात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजनावर ठोस निर्णय होणे गरजेचे आहे.
धाराशिव पोलीस विभाग धाराशिव, तहसिल कार्यालय व नगर परिषद यांनी संयुक्तपणे मोहिम उघडणून धाराशिव शहर हद्दीतील सर्वे नंबर 429 येथील वैराग नाका लगत गो माफीया यांनी अनाधिकृतरित्या चार ठिकाणी उभे केलेले कत्तलखान्याचे पुर्णपणे उध्वस्त करण्यात आले. पोलीस ठाणे धाराशिव शहरचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्यासह पोलीस अंमलदार, तहसिल कार्यालय, धाराशिव येथील नायब तहसिलदार शिंदे व त्यांचे कर्मचारी, धाराशिव नगर परिषदचे कार्यालयीन अधीक्षक कुलकर्णी हे उपस्थितीत होते जेसीबी, ट्रॅक्टर इत्यादी यंत्रणेसह हे उध्वस्त करण्यात आले.
पोलीस अधिक्षक रितू खोकर,अपर पोलीस अधिक्षक शाफकत आमना व उप विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात वारंवार काही भागात गोवंश हत्या होते, तिथे कारवाई होते, अनेक वेळा काही ठराविक आरोपी वारंवार त्यात सापडतात मात्र पुन्हा धंदा सुरु करतात, अश्या सवयीच्या आरोपीवर व जागावर ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी कारवाई झाली की त्यांना राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत असुन ते उघड होणे गरजेचे आहे.