धाराशिव – समय सारथी
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता असुन गेली 3 दिवसांपासुन धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले आहे. शेतकरी आंदोलनाचा धसका व विरोधामुळे धाराशिव जिल्ह्यातील महामार्गची मोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. जमिनी देण्यासाठी शेतकरी यांचा तीव्र विरोध आहे, मार्ग रद्द करा अशी मागणी आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थळी जात शेतकरी यांची भेट घेतली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी यांची भेट घेत आक्रमक भुमिका मांडली त्यानंतर अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मोजणी प्रक्रिया थांबावली असल्याचे जाहिर केले, या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, शिरीष यादव, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख , ऍड जितेंद्र पाटील उपस्थितीत होते . यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, शेतकरी संघटनेचे रवींद्र इंगळे उपस्थितीत होते.