धाराशिव – समय सारथी
बीएलओचे काम पुर्ण करून कर्तव्या वरून परत येत असताना भीषण अपघातात मृत्यू झाल्यामुळे शिक्षण गोविंद इंगळे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गोविंद भैरू इंगळे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंबळी या ठिकाणी कार्यरत होते, त्यांची नेमणूक तहसील कार्यालय धाराशिव यांनी 241 तुळजापुर विधानसभा अंतर्गत केली होती. 9 मे 2026 रोजी दुपारी 2.25 वाजता बीएलओचे काम पुर्ण करून बेंबळी येथून धाराशिवकडे परत येत असताना दुचाकी व चार चाकी यांचा भीषण अपघात होऊन इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला, यामुळे त्यांच्या कुटुंबाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
इंगळे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून भरीव आर्थिक स्वरूपात मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. भागवत घोगरे, विक्रम पाटील,प्रमोद शिंदे विभीषण पाटील, विकास चव्हाण, नेताजी ढवण, गणेश कदम, बालाजी भोसले, नितीन शिंदे, आर पी पाटील,दिगंबर कदम, विशाल सुर्यवंशी, कंदले, बामणीकर यांच्यासह शिक्षक उपस्थितीत होते.











