धाराशिव – समय सारथी
अन्याय सहन करणारा शिवसैनिक असू शकत नाही. हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द.. आपल्यावर अन्याय होतो तर म्हणूनच पक्षातील नेत्यांनी बंड केले त्यात काय चुकले. इतर लोकांवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार का असा सवाल ऍड अजित खोत यांनी उपस्थितीत केला आहे.
पक्ष विरोधी काम व प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे गटाचे युवासेना लातुर व बीड जिल्ह्याचे निरीक्षक अविनाश खापे यांचे पक्षातुन निलंबन करण्यात आले आहे, त्यानंतर ऍड अजित खोत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत काही प्रश्न उपस्थितीत करीत भावना मांडल्या आहेत. शिवसेनेचे एबी फॉर्म व जागा वाटप यावर खापे यांनी संपर्क प्रमुख राजन साळवी यांना जाब विचारत त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती.
शिवसैनिक अविनाश खापे निलंबन करणे अतिशय चुकीचे आहे. पक्षांमध्ये होत असलेल्या चुकीच्या घडामोडी त्याचप्रमाणे शिवसैनिकावर होत असलेल्या अन्यायकारक बाबीवर वरिष्ठांना फोन करून विचारणे यामध्ये कसे आले गैरवर्तन ? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होत. शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे, से ते सांगत. अन्याय सहन करणारा शिवसैनिक असू शकत नाही. हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द.. आपल्यावर अन्याय होतो तर म्हणूनच आपल्या पक्षातील नेत्यांनी बंड केले, असे खोत यांनी पोस्टमध्ये म्हण्टले आहे.
शिवसैनिक म्हणून माझा प्रश्न आहे. शिवसेनेचा तीन जिल्ह्यामध्ये डॉ तानाजीराव सावंत हे एकमेव आमदार.. विधानसभा लढविणाऱ्या उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीचे आमदाराचा फोटो बॅनर लावायचा परंतु शिवसेनेच्या आमदाराचा फोटो बॅनरवर लावायचा नाही. अशा व्यक्तींना तुम्ही गैरवर्तन केले म्हणून कारवाई करणार का ? असा सवाल केला.
जिल्हाप्रमुखाला विश्वासात न घेता जिल्ह्यातील युती करणे, एबी फॉर्म जिल्हाप्रमुखकडे असतात यावेळेस एबी फॉर्म कुणाकडे होते ही मी सांगायचे आपणाला गरज नाही कारण तालुकाप्रमुखाला उमेदवारी आणताना पक्षप्रमुखाकडे जावे लागले. हे अख्ख्या धाराशिव जिल्ह्याने बघितले मग असे का घडले आणि त्या घडवणार वर कारवाई होणार का ?
शिवसेनेच्या धाराशिव तालुक्यामध्ये पाच ग्रामपंचायत आहेत आपण त्यांना विश्वासात घेऊन जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करून दिला का ? जर शिवसैनिकच राहिला नाही तर धाराशिव तालुक्यामध्ये पक्ष जिवंत राहणार नाही. शिस्त असली पाहिजे हे मला मान्य.. पण बेशिस्त वागणारे प्रत्येक जण असतील तर त्यांच्यावर पण कारवाई होणार का ? शिवसैनिक म्हणून मी विचारलेले या प्रश्नाचे उत्तरे मला मिळतील का?
शेवटी एकच सांगतो पद हे कधीच कायमचे नसते सर्व कार्यकर्त्याला सोबत घेऊन कार्य करणारा नेता असतो तेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले आहे. म्हणूनच ते आजही वंदनीय आहेत आणि म्हणूनच ते शिवसैनिकांच्या मनातले खरे शिवसेनाप्रमुख आहेत.












