Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक अन तो वाद, जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट – डॉ पद्मसिंह पाटील यांनी केली पाठराखण 

समय सारथी by समय सारथी
June 2, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.1k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक असताना जितेंद्र आव्हाड अन त्यांच्यात झालेला वाद त्यानंतर डॉ पद्मसिंह पाटील यांची पाठराखण अश्या आठवणी जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत. मुख्यमंत्री नाईक व डॉ पद्मसिंह पाटील यांच्यात कायम दुरावा राहिला. नाईक यांना धक्का लागला व ते खाली पडले त्यावेळी झालेल्या वादात डॉ पाटील आव्हाड यांच्या मदतीला धावून आले असे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. नेता असावा तर असा असे म्हणत त्यांनी दोघांतील काही बाबी उघड केल्या आहेत.

आव्हाड पोस्ट

हा लेख प्रेमळ डॉक्टर साहेबांसाठी…सदैव वाहणारा एक नितळ खळखळणारा माणुसकीचा झरा.. सन 1989-90 चा काळ होता. माझी डॉक्टर साहेबांशी ओळख कशी व कुठे झाली हेच मला आठवत नाही. कारण त्यांनी मला इतक जवळ केले कि, जणू काही मी त्यांच्या घरातलाच. निष्ठा काय असते हे खरतंर मी त्यांच्याकडूनच शिकलो. आपला नेता जे सांगेल ती लक्ष्मणरेषा….

सन 1991 साली शरद पवार साहेबांविरुद्ध महाराष्ट्रात काही जणांनी बंड केले. त्या बंडाला सामोरे जाताना मी त्यांना बघितले. एखाद्या कार्यकर्त्याने जे करावं ते डॉक्टर साहेब करत होते. आपल्या वयाचा विचार न करता त्यांच वागण मी स्वत:च्या डोळ्याने बघीतले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याचा हात पकडून फक्त दाबला तर त्या नेत्याच्या डोळ्यात अश्रू आले म्हणजे कुठल्या ताकतीने तो हात दाबला गेला असेल याचा विचार आपणच करावा. तेव्हाचे एक महासचिव जे या बंडात साहेबांच्या विरोधात होते ते एका कॅबिनमध्ये बसले असता फोन खणखणला. फोन जवळ डॉक्टर साहेब बसले होते. दोघांचाही हात फोन उचलायला गेला. डॉक्टरांनी फोन तर उचललाच, पण उचलता उचलता तो फोन त्या नेत्याच्या तोंडावर बसला.. ते कस झाले असेल ते तुम्हीच समजून घ्या. 

शरद पवार साहेब संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले. जाताना इथे मुख्यमंत्री कोण याची स्पर्धा सुरु झाली. श्री. शरद पवार साहेबांच्या जवळ असलेल्या प्रत्येकाला वाटत होते कि डॉक्टर साहेबांनी मुख्यमंत्री व्हाव. मला त्यावेळस हे गट तट काही माहितीच नव्हते. पण, त्यांच्या जवळ असल्य़ा कारणाने मलाही वाटत होते कि त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं… तसे त्यांनी संध्याकाळी मला सांगितले देखील कि, सकाळी लवकर ये आपले नाव होईल अस वाटतय. पण, नंतर जे काही झाले ते वेगळेच होते. आणि श्री. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री झाले. सुधाकरराव मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली त्यानंतर राजकारणाला वेगळं वळण लागले आणि परत एकदा डॉक्टर साहेब हे शरद पवार साहेबांसाठी सक्रिय झाले.

डॉक्टर साहेब आणि सुधाकरराव नाईक यांच्यामध्ये दुरावा कायम होता त्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. रणजीत देशमुख हे होते. प्रणवकुमार मुखर्जी, श्री. जी. के. मुपनार आणि श्री. जनार्दन पुजारी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले होते. ह्या दोघांना भेटायला हायमाऊंट या शासकीय विश्रामगृहात सुधाकरराव नाईक आले. सुधाकरराव नाईक यांच्या जमावाने श्री. शरद पवार साहेबांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली असता तिथे आमची झटापट झाली. मी आणि श्री. मदन बाफना आम्ही दोघेच त्या ठिकाणी उपस्थित होतो. झटापटीमध्ये श्री. सुधाकरराव नाईक यांना धक्का लागला आणि ते खाली पडले. ही तक्रार श्री. सुधाकरराव नाईक यांनी श्री. प्रणवकुमार मुखर्जी व श्री. जी. के. मुपनार यांच्याकडे केली. तिथून काही अंतरावर राहत असलेल्या डॉक्टर साहेबांना लगेच बोलाविण्यात आले. 

डॉक्टर साहेब आले आणि जाताना मला आणि श्री. मदन बाफनांना विचारले काय झाले ? आम्ही सर्व सविस्तर सांगितले. ते वरुन खाली आले आणि आमच्याकडे बघून हसले. तेवढ्यात मुंबई पोलीसांची गाडी आली. त्या गाडीमधील एकाने उतरून मला बोलावले. माझे नशीब चांगले कि, त्याचवेळेस डॉक्टरसाहेब खाली आलेले होते. मला पोलीस बोलवत आहेत हे बघितल्यानंतर ते स्वत:च पुढे आले आणि विचारले काय झाले. पोलीसांनी सांगितले कि आम्हांला यांना चौकशीसाठी न्यायचे आहे. त्यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये सांगितले. ह्या घरातल्या भांडणात तुमचे काही काम नाही चला जा, त्यांनी मला सांगितले गाडीत बस आणि मला स्वत:च्या निवासस्थानी घेऊन गेले.

त्यानंतर बरीच वर्षे आम्ही त्यांच्या सानिध्यात काम केलं आहे. ते जेव्हा पाटबंधारे विभागाचे मंत्री होते. तेव्हा ठाण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी मी त्यांच्याकडे हट्ट धरला. तेव्हा माझा बालहट्ट हो बालहट्टच होता तो कारण मला वाटायचं की आपल्या ठाण्याला आणि ठाणेकरांना स्वतःच्या हक्काच धरण आणि पाणी मिळावं…माझा हट्ट

पूर्ण करण्यासाठी म्हणून मुंबईला देण्यासाठी 1952 साली चितळे आणि गोडबोले आयोगाने Notified (सुचविलेले) धरण हे त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नावावरुन काढून घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या नावावर केले. हे धरण झाल तर 2040 पर्यंत ठाण्याचा पाणी प्रश्न मिटेल अशी परिस्थिती त्यावेळेस होती. त्यांनी कुठलेले आडेवेडे न घेता ते धरण ठाणे महानगरपालिकेला देऊ केले अर्थात त्यानंतर शासनामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये थोडेसे समज गैरसमज होत गेले आणि महापालिकेने ते धरण करण्यास नकार दिला आणि  इतकी मोठी मोठी पद मिळूनही ठाण्याला आजही स्वतःचे हक्काचे पाणी नाही…

अशा अनेक गोष्टी मला त्यांच्याबद्दल सांगता येतील. पण, त्यांच्या सानिध्यातील दिवस हे कधीच विसरता येणार नाहीत. राष्ट्रपती बाजूला उभे आहेत. बाजूला श्री. शरद पवार साहेब उभे आहेत.दोघेही विमानतळावरती आहेत आणि डॉ. पद्मसिंह पाटील त्यांच्या बाजूलाच उभे राहून मी बाहेर गर्दीत उभा असतांना पटकन ओरडून म्हणाले ‘बंटी आतमध्ये ये’ हे मी कधीच विसरणार नाही. 

मला आजही आठवते कि, 9 मे 1991 रोजी मी औरंगाबाद येथे होतो.राजीव गांधी हे औरंगाबादला प्रचारासाठी आले होते. आतमध्ये राजीव गांधी, राजीव गांधी यांचे मित्र सुमन दुबे, श्री. शरद पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष श्री. निलंगीकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील हे आतमध्ये बसलेले होते. पटकन बाहेर एक पोलीस धावत आला आणि माझ्या कानात येऊन म्हणाला तुम्हांला आतमध्ये बोलावले आहे. आतमध्ये डॉ. साहेबांनी मला बोलावून घेतले आणि जवळ-जवळ 1 तास राजीव गांधी यांच्याबरोबर श्री. शरद पवार साहेब गप्पा मारत असतांना मी शांतपणाने हे सगळं बघत होतो. हे सगळं केवळ डॉक्टर साहेबांमुळेच माझ्या आयुष्यात घडले. इतका मनाने मोठा, निर्मळ माणूस माझ्या आयुष्यात आला हे मी माझे भाग्यच समजतो. त्यांचे चालणे, त्यांची व्यायामाची छाती हे सगळे त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभेसे होते.

हे सगळं असताना देखिल त्यांची मातृभक्ती ही वाखणण्याजोगी होती. एवढा मोठा कॅबिनेट मिनिस्टर, त्यांचा संपूर्ण राजकीय वर्तुळातील दरारा हे सगळं असताना त्यांच्या आईला ते दररोज संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे. त्यांच्या बिल्डिंगला लिफ्ट नव्हती. आई तिसऱ्या माळ्यावर भावाबरोबर राहायची. डॉक्टर साहेब तीला स्वतःच्या पाठीवर उचलून घेऊन खाली आणायचे. आणि फिरायला घेऊन जायचे व परत उचलून घेऊन घरी आणून सोडायचे. हे सगळ एका माणसाच्या व्यक्ती चारित्र्यामध्ये असणं ह्याच मला आश्चर्यच वाटत, त्यांच्या स्वभावामुळे राजकारणात त्यांची दहशत तर होतीच. पण, स्वकियांबरोबरच विरोधकांमध्येही आदरयुक्त भिती होती. मला खरतर श्री. शरद पवार साहेब यांच्या दारात दोन माणसे घेऊन गेली त्यांना मी कधीही विसरु शकत नाही. एक म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील आणि दुसरे म्हणजे सुरेश कलमाडी. 

आज डॉक्टर साहेबांचा वाढदिवस आहे. थकलेले डॉक्टर साहेब यांचा आवाज ऐकला कि, मन अस्वस्थ होतं. आजही मुंबईला कुठलिही राजकीय हालचाल झाली कि, सकाळी 6 ते 7 च्या मध्ये त्यांचा फोन येणार आणि परिस्थितीबद्दल विचारणा करणार. त्यांच्या मनातलं साहेबांविषयीचे प्रेम हे त्यांच्या प्रत्येक शब्दांत आजही दिसून येते. त्यांची प्रकृती ठणठणीत राहो आणि ते शतकवीर होवो ह्याच शुभेच्छा ! कारण आजच्या जगात अशी माणसे फार कमी आढळतात.

Previous Post

ड्रग्ज गुन्ह्यात विनोद गंगणेंच्या अर्जावर 6 जुनला सुनावणी, तात्पुरता जामीन, या आहेत ‘अटी’

Next Post

‘मित्रा’चा गोंधळ – राज्यमंत्री पद दर्जा नाही, डीव्ही कार व सुविधासाठी प्रशासनावर दबाव – हौस, संभ्रम

Related Posts

महाराष्ट्र

हत्या, चित्रा ताई पाटील यांचा मृतदेह सापडला – लेकरासारखं सांभाळल, सोन्यासाठी केला निर्घृण खुन

July 21, 2025
महाराष्ट्र

पत्ते उधळले, बॅनरवर दगडफेक – धाराशिव शहरात छावा संघटनेचे आंदोलन, राष्ट्रवादी विरुद्ध छावाचा यल्गार

July 21, 2025
महाराष्ट्र

‘तसे’ पत्र दिलेच नाही, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा खुलासा – पालकमंत्री सरनाईक बदला असे पत्र दिल्याचे प्रकरण 

July 21, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज प्रकरण – सेवन गटातील एका आरोपीला अटक, जामीन नाकारला, 13 आरोपी फरार 

July 19, 2025
महाराष्ट्र

ऑनलाईन गेमच्या व्यसनाचा विळखा, आर्थिक बरबादी आत्महत्या – आमदार कैलास पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

July 18, 2025
महाराष्ट्र

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा धाराशिव दौरा – हरीत धाराशिवसह अनेक कार्यक्रमांना उपस्थितीत राहणार

July 18, 2025
Next Post

'मित्रा'चा गोंधळ - राज्यमंत्री पद दर्जा नाही, डीव्ही कार व सुविधासाठी प्रशासनावर दबाव - हौस, संभ्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

हत्या, चित्रा ताई पाटील यांचा मृतदेह सापडला – लेकरासारखं सांभाळल, सोन्यासाठी केला निर्घृण खुन

July 21, 2025

पत्ते उधळले, बॅनरवर दगडफेक – धाराशिव शहरात छावा संघटनेचे आंदोलन, राष्ट्रवादी विरुद्ध छावाचा यल्गार

July 21, 2025

‘तसे’ पत्र दिलेच नाही, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा खुलासा – पालकमंत्री सरनाईक बदला असे पत्र दिल्याचे प्रकरण 

July 21, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp