धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील जहागिरदारवाडी परिसरात एका 25 वर्षीय युवकाने रेल्वेच्या रुळावर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयताचे नाव बाळु तुकाराम पंडीत (रा. लिटलस्टार शाळेजवळ, बॅक कॉलनी, धाराशिव) असे असून 17 जुन रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इर्शाद इसाक सय्यद (रा. पोलीस लाईन, धाराशिव) व नसरीन फिरोज मजकुरे (रा. मिली कॉलनी, धाराशिव) यांनी मयत बाळु याच्यावर दबाव टाकून “आमच्याशी लग्न कर, अन्यथा तुझी बदनामी करू” अशी धमकी दिली होती. या मानसिक त्रासाला कंटाळून बाळुने रेल्वे रुळावर जीव देण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
या प्रकरणी बाळुच्या आई राधाबाई तुकाराम पंडीत (वय 50 वर्षे, रा. भोपाल नगर, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 108, 351(2),(3), व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.