धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील बेपत्ता असलेल्या चित्रा ताई पाटील यांचा मृतदेह सोलापूर ते लातुर बायपास रोडवर नळदुर्ग रोड ब्रिज जवळ सापडला असुन त्यांचा गळा दाबून खुन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांचे पुत्र संग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनीओम नितीन निकम या आरोपीला अटक केली असुन त्याला पोलिसी खाक्या दाखवताचा त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
संग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांची आई एकत्र राहत होते, त्यांच्या आईच्या गळ्यात नेहमी दीड तोळ्याचे गंठण, पाटल्या असे 15 ते 16 तोळे सोने असायचे, त्या नेहमी ते सोने वापरत असत. शेजारील राहणारा 21 वर्षीय ओम निकम हा नेहमी घरी यायचा, त्याच्या लग्नाची व लग्न ठरल्याची बोलणी करायचा. 18 जुलै रोजी चित्रा ताई घरी नव्हत्या त्यावेळी त्यांच्या मुलाने घरी आल्यावर पत्नीस विचारले की, आई कुठे आहे तेव्हा त्या ओम निकम सोबत फोन आल्यावर कुठेतरी गेल्याचे सांगितले. त्या दिवशी रात्री उशीरा ओम निकम याला अनेक फोन केले मात्र त्याने आई सोबत नसल्याचे सांगितले त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली, पोलिसांनी तपास केल्यावर चित्रा ताईचा मृतदेह सापडला व त्यांच्या अंगावर दागिने नव्हते.
चित्रा ताई यांनी ज्या ओमला स्वतःच्या मुला, लेकरासारखं सांभाळल, त्याच्या सुखदुःखात आईसारखी खंबीरपणे आधार दिला त्याच मुलाने त्यांचा विश्वासघात केला, त्याचा गळा दाबून खुन केला व अंगावर असलेले सोन्याचे दागिने लुटले. माणुसकीला काळिमा फसणारे हे कृत्य घडले असुन यामुळे ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.