धाराशिव – समय सारथी
मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिवसेना नेत्यांना उद्देशून “भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे,” असे विधान केले होते. या वक्तव्याचे महायुतीत तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणे योग्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना खडसावले. धाराशीव येथील मेळाव्यातील वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटले.
शिवसेनेच्या मंत्र्यांनी “आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?” असा थेट सवाल करत राणेंच्या विधानावरून नाराजी व्यक्त केली. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत, “या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, ” असा सल्ला दिला. तसेच, कुणाचाही बाप काढणे योग्य नाही, संबंधित मंत्र्यांशी मी बोललो, ते म्हणाले माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, पण मी त्यांना सांगितले, तुमच्या मनात जो काही अर्थ असेल त्यापेक्षा जे परसेप्शन जाते ते राजकारणात महत्त्वाचे असते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाला मिळालेल्या स्थगितीवरून भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हल्ला चढवला होता. “कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा,” “सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कुणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा.