धाराशिव – समय सारथी
बेंबळी सरपंच विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे का तक्रार केली, त्या तक्रारीमुळे सरपंचपद धोक्यात आले आहे असे म्हणत सामाजिक कार्यकर्ते आकाश मुंगळे यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा प्रकार धाराशिव पंचायत समितीच्या आवारात घडला असुन समद शेख व सलमान शेख यांच्या विरोधात आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बेंबळी येथील गैरव्यव्हारबाबत मुंगळे यांनी तक्रार करीत आवाज उठवला होता, त्यावरून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. तु तक्रार का केलीस तुला माज आला आहे, तु गावात येणार तुला खल्लास करुन टाकतो असे म्हणत मारहाण केली आहे, पोलीस याचा तपास करीत आहेत. जीविताला धोका असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले असुन आपला लढा पदाचा दुरुपयोग करणाऱ्या भ्रष्टाचार व अश्या प्रवृत्तीविरोधात असल्याचे सांगितले.