धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात 28 ऑगस्ट रोजी 5 आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असुन 3 आरोपींच्या अर्जावर 29 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 7 आरोपी अद्याप फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
5 आरोपींचे जामीन अर्ज धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी स्तरावर प्रलंबित आहे. नानासाहेब खुराडे,पिनू तेलंग व विनायक इंगळे, अभिजीत गव्हाड, जगदीश कदम पाटील यांच्या अर्जावर 28 तर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत बापू कणे, संदीप टोले यासह नियमित सुनावणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 7 आरोपी फरार असून त्यात मुंबई येथील मुख्य तस्कर वैभव गोळे, इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, विनायक इंगळे, संदीप टोले, विशाल सोंजी व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे यांचा समावेश आहे. पोलिसांनी 38 आरोपींचे सेवन व तस्कर असे 2 गट केले असुन 28 आरोपी तस्कर तर 10 आरोपी सेवन गटात आहेत.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 आरोपी असुन अलोक शिंदे,उदय शेटे,विनोद उर्फ पिटू गंगणे, रणजीत पाटील, शुभम नेप्ते, दुर्गेश पवार, अभिजीत अमृतराव व राजू उर्फ पिट्टा सुर्वे, शामकुमार भोसले, टिपू सुलतान शेख या 10 जणांना जामीन मिळाला आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे तपास करीत आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजु मांडत आहेत.