धाराशिव – समय सारथी
जमिनीच्या वादातुन जुन्या भांडणाची कुरापत काढून पती पत्नीचा निर्घृण खुन केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील करजखेडा पाटोदा चौकात घडली आहे. सहदेव व प्रियांका पवार या पती पत्नीचा निर्घृण खुन करण्यात आला आहे. सहदेव यांच्यावर कोयत्याने 10 पेक्षा जास्त वार करण्यात आले आहेत तर पत्नी प्रियांका यांचा गळा चिरण्यात आला आहे.
आरोपीनी सुरुवातीला गाडीने धडक देऊन नंतर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. आरोपी जीवन चव्हाण, हरिबा चव्हाण या बाप लेकासह अन्य जणांनी मिळून हे हत्याकांड केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सहदेव हे 15 दिवसापूर्वीच जामीनावर बाहेर आले होते, जेलबाहेर येताच त्यांना काही दिवसात जीव गमवावा लागला, त्यांच्या पत्नीचा हाकनाक बळी गेला. सहदेव जेलमध्ये असताना त्यांच्या पत्नीला कोणी ऐका शब्दाने बोलले नाही किंवा त्या कोणाला काही बोलल्या नाहीत मात्र पती सोबत त्यांची हत्या करण्यात आली.
आरोपी व मयत सहदेव यांचा जमिनीचा वाद होता, त्या वादातुन सहदेव याच्यावर 307 चा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यांना 4 वर्षाची शिक्षा झाली होती. त्यानंतर गेली अनेक वर्ष सहदेव हे जेलमध्ये होते त्यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यालयाने त्यांना गेल्या 15 दिवसापुर्वी जामीन मंजुर केला होता त्यानंतर ते गावात आले, नंतर पूर्वीचा वाद यातून बदला घेण्यासाठी पती पत्नीची हत्या करण्यात आली. सहदेव यांच्यावर जवळपास 10 वार करण्यात आले असून पती पत्नीच्या हत्यानंतर त्यांची पहिली व तिसरीला असलेल्या 2 मुली पोरक्या झाल्या आहेत.
पत्नीचा यात नाहक बळी गेला त्याच्या नरड्यावर वार करण्यात आले जागीच मृत्यू झाला तर सहदेव यांचा धाराशिव येथे आल्यावर मृत्यू झाला उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्यासह पोलिस निरीक्षक गणेश पाटील यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.