धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत पोलिसांना मोठे यश आले असुन 3 आरोपीना अटक करण्यात आली आहे, हे 3 आरोपी फरार होते. ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी 12 जणांना आरोपी केले असुन त्यातील 9 जणांना अटक केली आहे तर 3 आरोपी फरार आहेत. 3 आरोपी जेलमध्ये आहेत तर उर्वरित 3 जण पोलिस कोठडीत आणि 3 जणांना अटक केली आहे. तपासात ड्रग्ज तस्करीचा उलघडा होत असुन आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. ड्रगज पेडलर व ड्रग्जचे सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर असुन सेवन करणाऱ्याच्या माध्यमातून ड्रग्ज पेडलर, तस्कर हाती लागतात का ? याचा शोध घेतला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, परंडा येथे ड्रग्जचे सिंडीकेट असल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा असुन त्या दृष्टीने तपास सुरु आहे.
तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना प्रथम ड्रग्जसह तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई येथील महिला तस्कर संगीता गोळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे, मुंबई येथील संतोष खोत,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे यांना आरोपी करण्यात आले.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक जाधव यांचा अनुभव व नेटवर्क यामुळे ड्रग्ज तस्करी पहिल्यांदा रेकॉर्डवर आली असुन आरोपीची साखळी उघड होत आहे.