धाराशिव
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी अभिजीत अमृतराव व सोलापूर येथील राजू उर्फ पिट्टा सुर्वे या 2 जणांना जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ऍड अमोल वरुडकर यांनी कोर्टात बाजु मांडली.
अमृतराव यांच्यावतीने ॲड वरुडकर यांनी जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ॲड वरुडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला तसेच आर्थिक व्यवहाराची खरी वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडली. ॲड. वरुडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अभिजीत अमृतराव याचा नियमित जामीन न्यायाधीश मिटकरी यांनी मंजूर केला. त्यामुळे अमृतराव यांना ड्रग्ज प्रकरणातून तूर्तास दिलासा मिळाला आहे.

ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 आरोपी असुन अलोक शिंदे,उदय शेटे,विनोद उर्फ पिटू गंगणे, रणजीत पाटील, शुभम नेप्ते, दुर्गेश पवार, अभिजीत अमृतराव व राजू उर्फ पिट्टा सुर्वे या 8 आरोपीना जामीन मिळाला आहे. 10 आरोपी फरार असुन 20 आरोपी धाराशिव येथील कारागृहात आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजु मांडत आहेत.
38 पैकी 10 आरोपी फरार असुन त्यांना अटक करणे पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सर्व फरार आरोपीना 15 ऑगस्टपर्यंत अटक करुन जामीनावर असलेल्या आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी असे आदेश दिल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.
5 आरोपींचे जामीन अर्ज धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी स्तरावर प्रलंबित आहे. नानासाहेब खुराडे 14 ऑगस्ट शामकुमार भोसले 13 ऑगस्ट रोजी, पिनू तेलंग व विनायक इंगळे 13 ऑगस्ट, चंद्रकांत बापू कणे 12 ऑगस्ट तर नियमित सुनावणी 12ऑगस्ट रोजी होणार आहे.
फरार आरोपीत मुंबई येथील मुख्य तस्कर वैभव गोळे, इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, अभिजीत गव्हाड, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे यांचा समावेश आहे. पोलिसांनी 38 आरोपींचे सेवन व तस्कर असे 2 गट केले असुन 28 आरोपी तस्कर तर 10 आरोपी सेवन गटात आहेत.