Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

विजय संकल्प सभा – महायुतीचे उमेदवार पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे धवल, हरीत, उद्योग क्रांतीचा नारा

समय सारथी by समय सारथी
July 10, 2025
in महाराष्ट्र
0
विजय संकल्प सभा – महायुतीचे उमेदवार पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे धवल, हरीत, उद्योग क्रांतीचा नारा
0
SHARES
515
VIEWS

दुष्काळी, आकांक्षितपणाचा डाग पुसण्याची शपथ – 11 कोटींचे वीज बील देणार, 2 हजार कोटींचा निधी आणला

भुम – समय सारथी 

महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर महायुतीची विजय संकल्प सभा पार पडली यावेळी सर्व नेत्यांनी सावंत यांच्या विजयाचा संकल्प केला. यावेळी मंत्री सावंत यांनी विकास कामांचा लेखाजोखा मांडत हरीत, धवल व उद्योग क्रांती करण्याचा नारा दिला. येत्या 5 वर्षात धाराशिव जिल्ह्याला लागलेला दुष्काळी, आकांक्षितपणाचा डाग पुसण्याची शपथ सावंत यांनी घेतली. शेतकऱ्यांवचे 11 कोटींचे वीज बील देणार असल्याचे सांगत त्यांनी 2 हजार कोटींचा निधी आणला असे सांगितले. 

2029 पर्यंत मी काय करणार हे महत्वाचे आहे. पाणी आल्यावर सगळे प्रश्न संपले असे नाही, पाणी सगळीकडे साठवण तलाव व वितरण व्यवस्था झाली पाहिजेत. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, हक्काची डीसीसी बँक मोडून खाल्ली, दुध संघ संपवला, सुतमिल शेअर गोळा केले मात्र ती सुरु झाली नाही त्या सर्व संस्था पुन्हा नावारुपास आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याची शेत धरण, तलावापासुन दुर आहेत त्यांना उपसा जलसिंचन संस्था नोंदणी करायला सुरु करा असे मंत्री सावंत म्हणाले. त्या पाणीपुरवठाचे सर्व 5 वर्षाचे प्रतीवर्षे 11 कोटी प्रमाणे 55 कोटींचे बील भैरवनाथ शुगर भरेल असे आश्वासन दिले. 26 नोव्हेंबर सरकार स्थापन होईल त्यात मी मंत्री म्हणुन शपथ घेईल असे सावंत म्हणाले.

एका वर्षाच्या आत 5 लाख मीटरचा दुध संघ भुम येथे करण्याचे वचन त्यांनी दिले. भुम परंडा वाशी येथे दीड दीड हजार एकरची एमआयडीसी मंजुर केली आहे, त्याबाबत मिटिंग झाली असुन पुणे मुंबई येथील उद्योजक यांना इथे उद्योग सुरु करुन रोजगार देऊ व स्थानिक तरुणांना उद्योजक बनवू, 4-5 हजार कोटींची गुंतवणूक आणल्याशिवाय शांत बसणार नाही. धवल, हरित, उद्योग क्रांती करायची आहे. गावोगावी विकास करायचा असुन 500 कोटी पेक्षा अधिक निधी आरोग्यासाठी दिला आहे असे सावंत म्हणाले. 

कृष्णा खोऱ्याचे काम पुर्ण होत आले असुन येत्या गुढीपाडव्या पर्यंत उजनीचे हक्काचे पाणी येणार आहे, जे टीका करतात त्यांना पाणी काय माहिती. सोन्याचा चमचा घेऊन ते आले आहेत त्यामुळे त्यांना काय माहित.मी जनतेचा सेवक आमदार म्हणून उभा आहे.मी कष्ट केले असुन पीएचडी केलेला गोल्ड मेडिलिस्ट आहे. शेतकऱ्यांचे दुःख, विकास त्यांना माहिती नाही. माझे 100 ते 125 कॉलेज आहेत, पुर्व भारतातील आदर्श असलेल्या पुणे विद्यापीठ येथे कॉलेज आहेत, जेएसपीएम विद्यापीठ आहे. अनेक मुलांना शिक्षण दिले. 2008 ते 2020 पर्यंत 9 साखर कारखाने भैरवनाथ समूहाने घेतले मात्र मोटे यांनी एक कारखाना बंद केला. फक्त फोन उचलण्याने विकास होत नाही, दीड हजार कोटींचा निधी आणायला मनगटात दम लागतो. बाळा तेरणा कोण बंद पाडला, भंगार कोण विकले, कामगार देशोधडीला लावला आणि ते विकासावर इथे येऊन बोलतात. पिंडीला लाथ मारली असे म्हणत मंत्री सावंत यांनी टीका केली. 

धाराशिव जिल्ह्यात 4 कारखाने असुन 1 तयार होत आहे, रोजगार दिला. बचत गटाच्या माध्यमातून रोजगार दिला त्यामुळे त्यांना 7-8 हजार महिन्याला मिळत आहेत. 2024 पर्यंत मी 24 महिने 42 निर्णय घेतले. महिला, वारकरी, तरुण यांच्यासाठी काम केले असल्याचे मंत्री सावंत म्हणाले. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवू असे वचन दिले होते, ते पुर्ण करणार आहे. 2 वर्ष वाया गेली त्यानंतर आम्ही उठाव केला आणि सत्ता आणली त्यांची सुरुवात भुम परंडा येथून केली. नेमक काय करावे हे कळेना झाले आहे, दोघांना एबी फॉर्म दिला आहे. आजच्या रॅलीने विजयाचा गुलाल उधळला आहे. सत्तातर झाले त्यानंतर आरोग्य मंत्री पदाची जबाबदारी दिली, गेल्या 2 वर्षात विकासाची गंगा आणली. करोडो रुपयांचा निधी आणला असे ते म्हणाले. 

महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून जितका निधी आला त्यापेक्षा जास्त निधी आणला. परंडासाठी 175 कोटी निधी आला, हे शहरात तर 13 गट व 26 गणात ग्रामीण भागात प्रत्येक गटात 40 कोटी निधी दिला, दीड हजार कोटींचा निधी आणला, समोरच्या उमेदवार याने कागदावर लिहून दाखवावे ते त्यांना जमणार नाही असे सावंत म्हणाले. हे सरकार देणारे सरकार आहे घरात बसून फेसबुकवर काम करणारे नाही. ठाकरे मुख्यमंत्री असताना आमदार यांना सुद्धा वर्षावर प्रवेश नव्हता मात्र शिंदे हे 18 तास काम करतात. 

सभेला गिरीराज सावंत,धनंजय सावंत, केशव सावंत,दत्ता साळुंके, गौतम लटके, संजय गाढवे, सुभाष सिद्धीवाल,बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, अण्णासाहेब देशमुख, जाकीर सौदागर, राहुल डोके, बालाजी गुंजाळ यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थितीत होते. 1 लाख मताच्या फरकाने विजयी होणार असल्याने निकाला दिवशी गुलाल घेऊन या असे सावंत म्हणाले. 5 वर्षात मागासलेपणाचा डाग पुसल्या शिवाय हा तानाजी सावंत शांत बसणार नाही शपथ मंत्री सावंत यांनी घेतली. लहुजी शक्ती सेनेने सावंत यांना पाठिंबा दिला. डॉ तानाजीराव सावंत यांच्या रूपाने देवदूत मिळाला असुन त्यांनी ग्रामीण भागात स्वखर्चाने रस्ते तयार केले आहेत तर साखर कारखाना सुरु करुन शेतकऱ्यांना आधार दिला आहे. न भुतो न भविष्याती असा निकाल लागणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले. मराठा व धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या वारसांना आर्थिक मदत केली आहे असे रिपाईचे संजय बनसोडे यांनी सांगितले. सोनारी येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधी पालकमंत्री डॉ सावंत यांनी दिला. मोटे यांनी बाणगंगा साखर कारखाना चालवला नाही, उसला कमी भाव देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला. पाणी आणले नाही ते काम सावंत यांनी केले. पाडाव्यापर्यंत पाणी येणार आहे. माजी आमदार मोटे यांनी विकास केला नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नवनाथ जगताप यांनी केली. 

महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना दराडे यांनी सांगितले की, महायुतीने महिलांना सन्मान दिला, जे शासन स्त्रीचा सन्मान करते ते टिकते, जे शासन अपमान करते ते टिकत नाही हा रामायण महाभारत इतिहास आहे. लाडकी बहीण, शेतकरी पेन्शन असे सरकार एका कुटुंबाला दरवर्षी 51 हजार देते.सावंत यांच्या पाठीशी महिला उभ्या राहतील असे त्यांनी सांगितले.महिला मोठ्या संख्येने आल्या असुन असे चित्र पहिल्यादा दिसत आहे.लाडकी बहीण योजना महिलांना आधार देणारी ठरत असल्याचे भाजपचे बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले. सुरुवातीला या योजनेवर टीका केली, योजना बंद पडेल, सरकार दिवाळखोरीत निघेल अशी टीका केली मात्र ती यशस्वी करुन दाखवली. सावंत यांचा विजय हा राज्यातील विक्रमी निकाल असेल त्यासाठी संकल्प सुनिल भोईटे यांनी केला. 

कोणत्याही राजकीय नेत्याने धर्मावर बोलु नये, विकासावर बोलावे, मोटे 15 वर्ष तर पाटील 10 वर्ष आमदार होते त्यांनी विकासवर बोलावे, त्यांनी विकास केला नाही. सावंत यांनी कोणालाही दुःखावले नाही, जातीभेद केला नाही, जात पात केला नाही. सावंत यांचा विकास पाहून त्यांना विजयी करा असे आवाहन जाकीर सौदागर यांनी मुस्लिम व सर्वधर्मियांना केले. आमिषाला बळी पडू नका.मी 3 निवडणुका लढलो पण विजयी झालो नाही पण मी ज्याचा प्रचार केला तो निवडुन आला. सावंत हे इसरूप पर्यंत पाणी आणणार आहेत असे बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर यांनी सांगितले. 

स्वतःचे लाईट बील भरायला राहुल मोटे यांनी विरोध केला. त्यांनी अर्ज भरण्यापुर्वी 5 वर्षाचे थकीत बील भरले तर ते शेतकऱ्यांचा विकास काय करणार. 1 हजार किमीचे रस्ते त्यांनी केले. धनगर आरक्षण आत्महत्या केलेल्या तरुणांच्या वारसाना मदत केली,तरुणांना शिक्षणासाठी पैसे दिले. त्यांच्याकडून आरक्षण मिळेल.सावंत यांनी महायुतीचे सरकार आणले, सरकार बदलण्याची ताकत त्यांच्यात आहे, इथे नंदनवन करायची क्षमता आहे त्यामुळे निवडुन द्या असे आवाहन केले. 

Previous Post

मी जनतेच्या मनातील मंत्री व आमदार – सामान्य जनतेने निवडणुक हातात घेतली – पालकमंत्री डॉ सावंत यांची प्रतिक्रिया 

Next Post

पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

Related Posts

महाराष्ट्र

भाई उद्धवराव पाटलांच्या जिल्ह्यात राजकारणाचा स्तर बिघडला – रक्तरंजित इतिहास ते ‘मारीन व बदडीन’ धमकीचे रिल्स – ऍड अजित खोत यांची पोस्ट

November 1, 2025
महाराष्ट्र

माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला – 2 जणावर गुन्हा नोंद

October 31, 2025
महाराष्ट्र

संचिका, कागदपत्रे गहाळ ? विशेष लेखापरीक्षण लांबणीवर – मुख्याधिकारी यांना पथक प्रमुख सुळ यांचे पुन्हा पत्र 

October 31, 2025
महाराष्ट्र

भाजप बदनामीचा घाट – निंबाळकर व राठोड वादाला राजकीय रंग देणे म्हणजे खोडसाळपणा – भाजप शहराध्यक्ष अमित शिंदे 

October 31, 2025
महाराष्ट्र

‘लाडका’ ठेकेदार – अनियमितता व 2 कोटींचा व्यवहार – सीडीआर तपासा, एसआयटी चौकशी करा – शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके

October 31, 2025
महाराष्ट्र

शिवसेना शिंदे आणि उबाठा गट एकाच नाण्याच्या दोन बाजू – भाजप प्रवक्ते ऍड नितीन भोसले 

October 31, 2025
Next Post
पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी - पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

भाई उद्धवराव पाटलांच्या जिल्ह्यात राजकारणाचा स्तर बिघडला – रक्तरंजित इतिहास ते ‘मारीन व बदडीन’ धमकीचे रिल्स – ऍड अजित खोत यांची पोस्ट

November 1, 2025

माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला – 2 जणावर गुन्हा नोंद

October 31, 2025

संचिका, कागदपत्रे गहाळ ? विशेष लेखापरीक्षण लांबणीवर – मुख्याधिकारी यांना पथक प्रमुख सुळ यांचे पुन्हा पत्र 

October 31, 2025
November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp