धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 7 आरोपींच्या जामीन अर्जावर त्यांच्या वकिलांनी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात युक्तीवाद सादर केला. आरोपींच्या वतीने ऍड अंगद पवार, ऍड रामेश्वर सुर्यवंशी, ऍड विशाल साखरे यांनी युक्तिवाद सादर केला त्यावर जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे 28 एप्रिलला सोमवारी युक्तिवाद सादर करतील. धाराशिव कारागृहातील संदीप राठोड, अमित आरगडे, युवराज दळवी, संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या 6 जणांसह मुंबई येथील फरार आरोपी वैभव गोळे यांनी अटकपूर्व असे 7 जणांनी जामीनासाठी अर्ज दाखल केले असुन त्यांच्या वकिलांनी कोर्टात सक्षमपणे बाजु मांडली. तुळजापूर ड्रग्ज गुन्ह्यात 36 आरोपी असुन 14 जेलमध्ये तर 22 फरार आहेत, पोलिसांचा शोध सुरू असुन फरार राहण्यात आरोपी यशस्वी ठरत आहेत.
आरोपी संगीता गोळे हिला ज्यावेळी अटक केली तेव्हा तीच्या ताब्यातील जुना मोबाईल व सोने जप्त केले, ते पाव किलो सोने तीचे लग्नाचे स्त्री धन असुन जी 5 कोटी रक्कम सापडली ती रक्कम गेल्या 10 वर्षातील कमाईची आहे. संगीता ही टॅक्स भरणारी असुन सर्व माहिती उपलब्ध आहे. संगीता ही इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत होती त्यानंतर तो सुरक्षा रक्षक म्हणुन काम करीत होती त्यामुळे ते पैसे तिने कामाविले असुन उत्पन्नाचा स्रोत काय आहे हे तिला जामीन मिळाल्याशिवाय सांगता येणार नाही अदा युक्तिवाद ऍड रामेश्वर सूर्यवंशी यांनी सादर केला. आरोपी संगीता सोबत तिची 1 वर्षाची मुलगी जेलमध्ये सोबत आहे, त्या मुलींला मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे. तिचा तो अधिकार संरक्षित राहावा व त्याला बाधित होऊ नये यासाठी जामीन द्यावा अशी विनंती कोर्टाला करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे दाखले देण्यात आले. संतोष खोत हा कुटुंबकर्ता असुन त्यालाही जामीन द्यावा अशी विनंती केली.
आरोपी अमित अरगडे व युवराज दळवी यांच्या वतीने ऍड अंगद पवार यांनी युक्तिवाद सादर केला. गुन्हा नोंद झाल्यावर अटक करतेवेळी नोटीसमध्ये अटकेची करणे लेखी नमुद करणे गरजेचे होते मात्र पोलिसांनी ते केले नाही. नियमांचे पालन पोलिसांनी न केल्याने अटक, रिमांड, मुद्देमाल जप्ती व इतर सर्व प्रक्रिया बेकायदेशीर आहे. पोलिसांनी अनेक बाबींचे उल्लंघन केले अस्याचे सांगत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे दाखले देण्यात आले. मुद्देमाल जप्त, त्याचे नमुने (सॅम्पल) घेते वेळी बंधनकारक असलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन केले नाही. 45 ग्रॅम जप्ती पंचनामामध्ये ड्रग्ज दाखवले असताना मॅजिस्ट्रेट समोर 43 ग्रॅम आले, 2 ग्रॅम गेले कुठे, हे असे का ? पोलिसांनी नमुने घ्यायचे नाही असे नमुद आहे मात्र ते घेतले गेले. एक प्लास्टिक पाऊच 20 मिली ग्रॅम असे तर 13 ग्रॅम प्लास्टिक वजन कमी झाले पाहिजे असे एकंदरीत सगळे चुकीचे आहे असा युक्तिवाद ऍड पवार यांनी केला..
पंचनाम्यात पांढरी पावडर असा उल्लेख केला ती टॉलकम पावडर देखील असु शकते. तसेच इन्व्हेंटरीमध्ये सॅम्पलचे वजन झिरो ग्रॅम दाखविले आहे त्यामुळे रिकामे पॉकेट पाठवले आहे असे म्हणत त्याचा वैज्ञानिक तपासणी अहवाल सुद्धा तसाच झिरो येणार व भविष्यात आरोपी निर्दोष सुटणार आहे असा दावा ऍड पवार यांनी केला. जर आरोपी सुटणार असतील तर मग अटक का असे म्हणत काही केस लॉ देण्यात आले.
अरगडे व दळवी हे दोघे गाडीचा मालक नाहीत, त्यांचा त्यात संबंध नाही, ड्राइव्हर नाही. 3 इसम दिसुन आले, कोण काय करीत होते हे त्यात नमुद नाही, हे आरोपी त्या गाडीत प्रवासी होतो, झडतीमध्ये मोबाईल सोडता काही सापडले नाही. जप्त ड्रग्ज हे गाडीच्या सीट खाली सापडले, पहिल्या मालकाने ठेवले असेल असे ऍड पवार म्हणाले. आमच्या ताब्यातून काही जप्त नाही. दोन्ही आरोपी घरातील कर्ते आहेत, त्याची गुन्हेगारी पार्शवभुमी नाही, तपास करण्यासाठी काही शिल्लक नसुन दोषारोपपत्र दाखल झाले आहे, जामीन दिल्यास नियम व अटी पाळू असे ऍड पवार म्हणाले.
संदीप राठोड व संकेत शिंदे या आरोपींच्या वतीने ऍड विशाल साखरे यांनी बाजु मांडत युक्तिवाद सादर केला. तामलवाडी पोलिस ठाणे ते घटनास्थळ टोल नाका हे अंतर 5 ते 10 मिनिटाचे असताना गुन्हा नोंद करण्यासाठी, पंचनामा करण्यासाठी वेळ का लागला असे मुद्दे उपस्थितीत केले. गुन्हा घडलेली वेळ, जप्ती पंचनामा पाहता गुन्हा नोंद झाला त्याला इतका उशीर का ? सर्व सॅम्पल मिक्स एकत्र करुन नमुने घेणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही, एका आरोपीचे लग्न ठरले असुन साखरपुडा झाला आहे या बाबीचा विचार करावा. सर्व पॉकेटचे 4 पॉकेट करण्याचा अधिकार पोलिसांना कोण दिला, पॅकेटला मार्किंग न करता 4 पॉकेट केले हे नियमाचे उल्लंघन आहे त्यामुळे सगळी प्रक्रिया चूकीची असल्याने आरोपीना जामीन द्यावा अशी विनंती ऍड साखरे यांनी केली.