धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जगदीश कदम पाटील यांना नियमित व संदीप टोले यांना अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे, त्यांच्या वतीने कदम यांच्यावतीने ऍड विशाल साखरे, टोलेकडुन ऍड प्रवीण लोमटे यांनी कोर्टात बाजु मांडली. अभिजीत गव्हाड यांचा जामीन अर्ज नाकारला त्यांच्या वतीने ऍड युवराज खैरे यांनी बाजु मांडली. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांचा जामीन अर्ज प्रलंबित असुन 15 सप्टेंबला सुनावणी होणार आहे. 11 सप्टेंबरला आरोपींच्या जामीन अर्जावर नियमित सुनावणी होणार आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजु मांडत आहेत.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 3 आरोपी अद्याप फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मुंबई येथील मुख्य तस्कर वैभव गोळे, इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर हे 2 आरोपी गुन्हा नोंद झाल्यापासून जवळपास गेली 6 महिनेपेक्षा अधिक काळ फरार आहेत. वैभव गोळे हा मुंबई येथील मोहरक्या आहे तर मिटू ठाकूर हा नळदुर्ग येथील आरोपी आहे. त्याने एकाच्या नावाने खरेदी केलेली गाडी या ड्रग्ज तस्करीत वापरल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी अल्टीमेटम दिल्यावर पोलिसांनी अनेक आरोपीना अटक केली, उर्वरित आरोपी बाबत मोहीम राबवण्याची गरज आहे.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 3 आरोपी फरार असून त्यात मुंबई येथील मुख्य तस्कर वैभव गोळे, इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर, विशाल सोंजी यांचा समावेश आहे. पोलिसांनी 38 आरोपींचे सेवन व तस्कर असे 2 गट केले असुन 28 आरोपी तस्कर तर 10 आरोपी सेवन गटात आहेत.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 आरोपी असुन अलोक शिंदे,उदय शेटे,विनोद उर्फ पिटू गंगणे, रणजीत पाटील, शुभम नेप्ते, दुर्गेश पवार, अभिजीत अमृतराव व राजू उर्फ पिट्टा सुर्वे, शामकुमार भोसले, टिपू सुलतान शेख, नानासाहेब खुराडे, पिनू तेलंग, विनायक इंगळे, जगदीश पाटील या 14 जणांना जामीन मिळाला आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे तपास करीत आहेत.