धाराशिव – समय सारथी
भावजयीमुळे कुटुंबाची बदनामी झाल्याच्या रागातून माथेफिरू दिराने सख्ख्या भावाच्या 13 महिन्यांच्या मुलीलाचा शेतात नेऊन तिचा गळा आवळून खून केला. नंतर कोयत्याने तिच्या शरीराचे 7 तुकडे करून ते पोत्यात भरून शेताजवळील नाल्यात पुरल्याची धक्कादायक घटना घडली. तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येताजील ही घटना असुन शंकरेश्वर माने असे आरोपीचे नाव आहे. पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघड झाला.
गवळेवाडी येथील 22 वर्षीय विवाहिता तीच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. या प्रकरणी महिलेच्या पतीने तामलवाडी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिस महिला व तिच्या प्रियकराचा शोध घेत होते. याच दरम्यान 27 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास या महिलेची 13 महिन्यांची मुलगी घरातून गायब झाली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पळून गेलेल्या विवाहिता व तिच्या प्रियकराचा शोध घेतला. ती तुळजापूर तालुक्यातील बावी येथे 27 फेब्रुवारीला सापडली.
पोलिसांनी चौकशी केली असता तिने मुलगी आपल्याकडे नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध चिमुकलीस पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांना मुलीचा काका शंकरेश्वर याच्यावर संशय आला. त्यास ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने 13 महिन्यांच्या पुतणीचा खून केल्याची कबुली दिली. भावाची पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने कुटुंबाची बदनामी झाल्याचा राग अनावर झाल्याने हे कृत्य केले.
13 महिन्यांच्या पुतणीला 27 फेब्रुवारी रोजी पहाटे उचलून शेतात नेले. तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर कोयत्याने 7 तुकडे केले. हे तुकडे पोत्यात घालून एका छोट्या नाल्यात पुरून ठेवल्याची कबुली त्याने दिली. तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. चिमुकलीचा खून करताना गावातीलच एका व्यक्तीने बघितले होते. त्याने पोलिसांना माहिती देताच या घटनेचा उलगडा झाला.
पोलिस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर व त्यांच्या पथकाने अवघ्या 24 तासांत उलगडला. या पथकात पोलीस हवालदार जुबेर काझी, आकाश सुरनर, नितीन भोसले तसेच पोलीस अंमलदार सूरज नरवडे, नझीर बागवान, उमेश माने, तुराब शेख व मनोज गोबाडे यांचा समावेश होता.












