धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने नानासाहेब खुराडे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व विनायक इंगळे या 3 आरोपीना जामीन मंजुर केला आहे. 29 ऑगस्ट रोजी 5 आरोपींच्या जामीन अर्जावर नियमित सुनावणी होणार आहे. ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 4 आरोपी अद्याप फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी झाली. नानासाहेब खुराडे,पिनू तेलंग व विनायक इंगळे यांच्या वतीने ऍड अमोल वरुडकर, ऍड विशाल साखरे, ऍड संजय व्हटकर यांनी काम पाहिले. अभिजीत गव्हाड, जगदीश कदम पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत बापू कणे, संदीप टोले यासह नियमित सुनावणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 4 आरोपी फरार असून त्यात मुंबई येथील मुख्य तस्कर वैभव गोळे, इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर, संदीप टोले, विशाल सोंजी यांचा समावेश आहे. पोलिसांनी 38 आरोपींचे सेवन व तस्कर असे 2 गट केले असुन 28 आरोपी तस्कर तर 10 आरोपी सेवन गटात आहेत.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 आरोपी असुन अलोक शिंदे,उदय शेटे,विनोद उर्फ पिटू गंगणे, रणजीत पाटील, शुभम नेप्ते, दुर्गेश पवार, अभिजीत अमृतराव व राजू उर्फ पिट्टा सुर्वे, शामकुमार भोसले, टिपू सुलतान शेख, नानासाहेब खुराडे, पिनू तेलंग, विनायक इंगळे या 13 जणांना जामीन मिळाला आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे तपास करीत आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजु मांडत आहेत.